हल्ली मी
कविता लिहायला तर घेते
पण... .त्या अधुर्याच राहतात
आपल्या पहिल्या अधूर्या भेटी सारख्या
लिहायचे तर असते भरपूर कही
पण.भावनाच फ़क्त दाटून येतात
आणि लिहिणे मात्र अधूरे राहते
अगदी आपल्या पहिल्या भेटी सारखे
हे आता असच होत राहीन
तुझ्या भेटितले अधूरेपन
सतत सतवत राहिल
आणि..........कविता माझ्या
अशाच अधूर्या "अर्थपूर्ण"
आपल्या पहिल्या अधूर्या भेटी सारख्या.............
निर्मला........
No comments:
Post a Comment